Powered By Blogger

Saturday, May 31, 2014

मनातून भाग ५ - आपलेपणा


आपलेपणा नेहमी दिसून येतोच अस नसत.  बोलून शब्द व्यक्त होउ शकतात पण समोरच्या माणसाला आपलेपणा जाणवावा लागतो तो बोलून दाखवण्याचा प्रकार नाही.  कधी  स्वत: हुन केलेली एखादी कृति  तर कधी न सांगताच समजुन घेतलेली गोष्ट, कधी आपल्याला वाईट वाटू नये म्हणुन जाणून बुजून  लपवलेली नावडती गोष्ट तर कधी मुद्दाम घडवून आणलेली आपली आवडती गोष्ट. अशा एक ना अनेक गोष्टी आपलेपणा निर्माण करत असतात.
माणुस दूर गेल की भरुन येणारे डोळे किंवा नुसत्या आठवणीने हिरमुसणार मन याचीच प्रचिती देत असतात.
गृहीत धरणा जस कधी कधी खुप जिव्हारी लागु शकता तसच आपलेपणात ते हवहवस वाटू लागत. स्वतः बरोबर आपला विचार करणार माणुस प्रत्येकालाच हवा असत.
आजुबाजुला पाहताना इतकी नाती केवळ समाज का्य म्हणेल या प्रश्नाला अडून अजुन तग धरून राहताना दिसत असताना मला प्रश्न पडला की नाती कोरडी का होत असावीत आणि उत्तर मिळाल  ते  टेरेस मधल्या निळ्या जांभळ्या रंगांच्या बहरलेल्या झाडाकड़े पाहून. भर उन्हात ते इतक ताजतवाने कस राहू शकता ? म्हणुन वर पहिला तर निळ आकाश खाली डोकावून पाहत असल्या सारखा जाणवल. मग वाटला आकाशाच प्रतिबिम्ब तर उतरला नाही ना या फुलांमधे ?
निसर्गाच कुठल रुप का्य दाखवेल काही सांगता येत नाही. कुणाला अंगाची लाही लाही करणारा उन दिसत तर कुणाला शुभ्र आकाश.
आकाश आणि फुलात कुठून येत असेल ती आपलेपणाची भावना ?  मला वाटता निसर्ग एकच असतो म्हणून सगळ्या गोष्टीत आपलेपणा दिसतो.
नाती ही स्वार्थी असतात आपल्याला हवा त्याचीच अपेक्षा ती करत राहतात. जित्याजागत्या माणसांची परवड होत राहते. अपेक्षा कधीच आपलेपणा निर्माण करत नाहीत हे समजुन घ्यायलाहि थाम्बायला वेळ नसतो.
"तुला माझी कदर नाही किंवा तुला मी समजलेच नाहीये " अशी बिनबुडाची वाक्य एकमेकाना सुनावली जातात तेव्हा खरतर गरज असते स्वतः सावरायची आणि आपल्या माणसाला जपायची पण स्वतःत हरवलेल्या जिवाला धूसर झालेला आपलेपणा दिसत नाही. आलेल्या परीस्थितिला सामोरा जाऊन माणुस जपायच की स्वाधीन होउन नुसता पाहत बसायच हे ज्याचा त्याने ठरवाव.
पण शेवटी खर हेच असत की माणसाला माणुस लागत मग ते कुणाच्याही रुपात असल तरी फरक पडत नाही. कुणाला ते रक्ताच्या नात्यात सापडत तर कुणाला मैत्रीच्या.
आपलेपणात नाती फुलतात , छोट्या छोट्या आनंदाची नांदी होते , समाजात वावरताना एकटेपणा जाणवत नाही आणि जगाच्या पाठीवर कुठेही गेल तरी पापण्या ओल्या करणार माणुस असल्याची खात्री असते.
मला वाटत माणसाला चार भिंतींची गरज नसते तर गरज असते वर पसरलेल्या  आकाशाख़ाली चालताना उन वारा आणि पावसात काळजी करणार आपल माणुस.!
भिंती माणस तोड्तात आणि आकाश जग जोड़त....!


                                                आनंद
                                              31 मे 2014