Powered By Blogger

Sunday, May 31, 2015

शब्दविन संवादू

नुकताच परक्या देशातून परत भारतात आल्या मुळे एका नव्या संस्कृतीची ओळख थोडीफार का होइना झाली होती. या वेळी परका देश चीन असल्यामुळे भाषा हा मोठा अडसर ठरणार होता. जाण्या आधी हीच धास्ती होती. संवादामुळे विचाराचि देवाण घेवाण होते पण इथे तोच दुवा कमकुवत होता.  तिथे पोहोचल्या नंतर सुद्धा हा समज अजुन दृढ़ झाला. कारण इंग्लिश येणारे 1-2 जण सोडले तर बाकि सगळा दुष्काळच होता.  हळुहळू दिवस जाऊ लागले आणि शब्दाविना संवादू असा काहीसा प्रकार जमू लागला. 

मग ते ऑफिस मधले सहकारी असोत किंवा सुपर मार्केट मधला स्टाफ किंवा रस्त्यावरच्या फ़ास्ट फ़ूड च्या गाड़ी वरचं चायनिज जोडपे किंवा मी रहायचो तिथल्या होटल मधले कर्मचारी किंवा आइसक्रीम च्या दुकानातला पोरगा किंवा फ़ॉरेस्ट मधे चित्रकला काढणारया मुली किंवा yello mountain ला ट्रेकिंग ला आलेली फॅमिली किंवा ऑफिस मधल्या सहकारी मित्राचा मित्रांचा ग्रुप असो किंवा टैक्सी ड्राईवर असो कुठेही  शब्द अडसर ठरत नव्हते.
ऑफिस मधल्या सहकार्यां बरोबर तर एक प्रकारचा बॉन्डिंग तयार झाला आणि पुढे तर ते मैत्रीत बदलला.  बोलताना नेमके शब्द सापडले नाहीत तरी केवळ काही गोष्टी गृहीत धरून एकमेकांना  समजुन घेउन संवाद पुढे चालू राहु राहात होता.

या सगळ्यात हे मात्र खरं होतं की शेवटी व्यक्त व्ह्यायला भाषा हा माणसाने बनवलेल एक साधन 
आहे. . मनातले विचार शब्द बद्ध करून ते मांडणे आणि समोरच्याचे शब्द ऐकून त्याचा अर्थ लावणे ही क्रिया आपल्याला येणारया मात्रूभाषेत बोलताना इतकी सहज होते ती कळुनही  येत नाही.
आणि नेमका याच्या उलटी गोष्ट परक्या भाषेला सामोरा जाताना होते.
त्या मुळेच मला वाटणारा भाषेचा अडसर मोठा वाटत होता, पण प्रत्यक्षात ही खरतर संधी होती एका नव्या अनुभवाला सामोरा जाउन तो आत्मसात करण्याचीहे मला ज्या क्षणी जाणवल तेव्हा पटल की माणस जोडायला शब्द धावून येत नाहीत तर तिथे मुळात संवादाची तीव्र इच्छा कामी पडते

भाषा ,धर्म ,संस्कृति हे सगळच खरतर तस मेनमेड आहे , खरं आणि शाश्वत आहे ते न दिसणार पण सतत साथ देणारा भावनांच अदृश्य आवरण जे माणसाला जागं ठेवून आहे.
नाती किंवा संबंध जोडले जातात ते प्रथम आतून जेव्हा माणसाला शब्दांची  ओळख सुध्हा नसते. म्हणुनच लहान बाळ आपल्या सभोवतालच्या माणसांशी बंध जोडू शकतं. भाषा शब्द काहिहि नसले तरीही तो धागा मात्र हळुहळु घट्ट होत असतो. 



माणसाला माणसाची ओळख पटली की शब्द फ़क्त मनातल्या भावनांचे वाहक ठरतात. 
आईच्या मनातलं ओळखुन मुलाने केलेली कृति , नवरा बायकोने  मनातलं ओळखुन एकमेकांची जपलेली मने, न बोलता मंदिरात जोडलेले हात ,मित्रां सोबत डोळे भरुन पाहिलेला सूर्यास्त , पहिल्या पावसाला पाहून अंगावर आलेला शहारा तर कधी निरागस हास्य पाहून मनात उमटलेल्या लहरीएखादं बक्षिस मिळाल्यावर वडिलांनी न बोलता पाठीवर दिलेली दाद ,म्हातारया आज्जिचा हात हातात घेउन घालावलेली संध्याकाळ , असे आणि अजुन खुप सारया  संवेदना ,भावना शब्दविन संवादू याच प्रकारात मोडतात आणि आपल्याही न कळत आपण ते अनुभवत असतो.
जगण्याचा समतोल खरं तर कदाचित अशा गोष्टीनेच टिकून राहत असावा कारण न बोलता केलेल्या कृतीच चिरकाल स्मरणात राहतात.
शब्द कधी सुख देतात , कधी सांत्वन करतात , कधी वार करतात पण जेव्हा निरुपयोगी ठरतात तेव्हा सगळ्यात जास्त संवाद साधत असतात हे कळलं की शब्दविन संवादू याचा खरा अर्थ उमगतो.

                                                                    आनंद 
                                                                    ३१ मे २०१५