Powered By Blogger

Sunday, January 23, 2011

महाबळेश्वर ट्रीप - २२ जानेवारी २०११



मानव्य :
मानव्य हि smt. विजयाताई लवाटे यांनी १९९५ साली स्थापन केलेली संस्था पुण्यापासून साधारण १२ km अंतरावर भूगाव या गावात आहे. जन्मतःच H.I.V +ve असणाऱ्या मुलांची तिथे राहण्याची ,शिक्षणाची आणि त्याच बरोबर त्यांची औषधं तसेच दवाखाना याची सोय इथे केली जाते.
माझ्या कंपनीमधल्या Coportate Social Responsiblity (CSR) ग्रुपमार्फत मी या संस्थेशी जोडला गेलो. संस्थेचा सगळा पसारा पाहूनखरंच अगदी भरून यायला होतं. मागच्या वर्षी दिवाळी च्या निमित्ताने १-२ कार्यक्रमाच्या मधून तिथल्या मुलाचं भावविश्व जवळून पाहायला मिळालं.  याचंच पुढचं पाउल म्हणून २२ जानेवारीला या मुलांबरोबर आम्ही सगळ्यांनी महाबळेश्वर ट्रीप ठरवली. १० लोकांचे २० हात कामाला लागले आणि शेवटी एक वेगळा दिवस अनुभवून आम्ही सगळे रात्री परत आलो.
मात्र परत आल्यानंतर मनामध्ये विचारांचं नुसता काहूर माजलं. एका दिवसात त्या मुलांनी मला अनेक अवघड प्रश्नांची खूप सोपी उत्तरं दिली होती आणि मलाच अनेक अवघड प्रश्न घातले होते. त्यामुळे लिहाव तर लागणारच होतं.
संस्थेमध्ये एकूण ५० मुलं आहेत त्यामधे २१ मुली आणि २९ मुलं. सकाळी ७.३० वाजता निघायची वेळ ठरली. एवढ्या सकाळी मुलं तयार होतील कि नाही असे विचार मनात येत होते पण ठरल्यावेळेला आम्ही संस्थेमध्ये गेलो तोच समोरचं दृश्य पाहून मला माझ्याच विचाराचं हसू आलं. सगळी मुलं स्वेटर घालून २ -२ च्या जोड्या करून आधीच रांगेमध्ये उभी होती. सगळ्या मुलांना २ बस मध्ये बसवून शेवटी आम्ही ८.३० वाजता निघालो. आपण सगळे फिरायला चाललो आहोत या कल्पनेनंच मुलं खूप खुश दिसत होती. आणि त्यांच्या चेहरया वरचा आनंद पाहून मल छान वाटत होतं. बस मधल्या टीव्ही वर कार्टून बघण्यात त्यांना खूप मजा वाटत होती. मधेच वाटेत लागणारा घाट, बोगदा, डोंगर हे पाहण्यातही मुलं गुंग होती. 

पाचगणी :
 साधरण ११ वाजता आम्ही पाचगणी ला टेबललेंड ला पोहोचलो. तिथे फिरण्यासाठी घोडागाड्या घेतल्या . प्रत्येक गाडी मध्ये ८ जण असं बसवून आम्ही राईड ला निघालो. घोडागाडी मध्ये बसल्यावर तर प्रत्येक प्रत्येकाला काय करू आणि काय नाही असं झालं होतं. घोडा गाडीची ती धावती राईड संपल्यावर तिथे असलेल्या केव्हस पाहण्यासाठी आम्ही सगळे खाली उतरलो. तिथली माकडं पाहून मुलांना खूप गम्मत वाटत होती. कधीही न घेतलेला अनुभव पहिल्यांदा घेतल्यावर मनात काय काय होत असेल याचा विचार मी करत होतो आणि त्याच बरोबर माझ्या आयुष्यातल्या अशा प्रसंगाची आठवण जागी करायचं प्रयत्न सुद्धा. पाचगणी मधेच आम्ही मग जेवण्यासाठी एके ठिकाणी थांबलो. भूक लागल्यामुळे लागल्यामुळे सगळे अगदी मनसोक्त जेवलो. आणि मग महाबळेश्वर साठी निघालो.
                                  
                                                                                                            


महाबळेश्वर मंदिर :  पाचगणी मधून निघाल्यावर सगळे पुन्हा ताजेतवाने झाले होते. आणि मग मी गिफ्ट देणार असं सांगून त्यांना गाणी म्हणायला सांगितली. सगळ्या मुली इतक्या छान गात होत्या, कि मी आणि माझ्या बरोबरचे माझे सहकारी अगदी थक्क होत होतो. सगळयाच मुलीचं पाठांतर आपल्याला लाजवेल असं होतं. आणि एक थांबताच दुसरी आपला आवाज त्यात मिसळत होती. हे सगळं होत असताना त्यांनी मला त्यांच्यात कधी सामावून घेतला कळलंच नाही. आनंददादा अशी त्यांची हाक मला फार आपली वाटत होती. आम्ही मग संदीप खरे  आणि सलील कुलकर्णीची  गाणी सुरु केली. , मी मोर्चा नेला नाही, मी हजार चिंतानी , अगोबाई ढगोबाई, दमलेल्या बाबांची कहाणी, अशी खूप गाणी गायली. मनात विचार आला “दमलेल्या बाबांची कहाणी” हे गाताना आई आणि बाबा नसलेल्या त्या जीवाला ती आर्तता कोण देत असेल ? काय काय विचार येत असतील त्या सगळ्यांच्या मनात ? क्षणाक्षणाला डोळे भरून येत होते.
सगळ्यांना गिफ्ट वाटून झाली. आणि मग “चिमुकल्या चोची मध्ये आभाळाचे गाणे” हे नवीन गाणं मी त्यांना शिकवलं आणि त्यांनाही ते आवडलं. आणि अगदी १०-१५ मि. मध्ये सगळ्याजणी अगदी सुरात ते म्हणू लागल्या. आणि मग मात्र सरीवर सरं, आताशा असे हे , नसतेस घरी तू जेव्हा हि सगळी गाणी त्यांनी माझ्याकडून आनंददादा अजून एक अजून एक अशी करत गाऊन घेतली. आणि त्यांची ती फर्माईश मी हि नाकारू शकलो नाही आणि गाणी झाल्यावर ती आम्हाला वहीमध्ये लिहून हवी आहेत अशी अट घालून मग मला थांबायची परवानगी मिळाली. परक्याला आपलासं करण्याचं एक अजब रसायन लहान मुलांकडे असतं असा माझा ठाम विश्वास आहे आणि ते पुन्हा एकदा सिध्द झालं होतं. या मुलांनी मला आपलंसं तर केल होतंच पण त्याच बरोबर एक नवा विश्वास सुद्धा दिला होतं आणि तो म्हणजे माणसं जोडणे हि कला फार सोपी असते आणि त्या साठी गरज असते ती फक्त निर्मळ मनाने केलेल्या  प्रामाणिक प्रयत्नांची.



 
महाबळेश्वर च्या मंदिरामध्ये दर्शन घेतल्यावर आम्ही आर्थर पोईंट , एको पोईंट साठी निघालो. आर्थर पोईंट वरून दूरदूर वर दिसणारे डोंगर पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं आणि आपण इतक्या उंचीवर आहोत याचं अप्रूप. सूर्य अस्ताला निघालाच होता. सावित्री पोईंट वरून तो लाल गोळा डोंगामागे कसा जातोय हे बस मधूनच पहिल. आणि परतीची वाट धरली. या सगळ्यात पोईंट म्हणजे काय, अस्त म्हणजे काय, एको म्हणजे काय, शंकरा समोर नंदी का असतो, पंचकुंड म्हणजे काय असे बालसुलभ प्रश्न विचारून मला अगदी त्यांनी घेरून सोडलं होतं.

जेव्हा मी त्यांना सांगितलं कि आता आपण परत जायच आहे तेव्हा एका चिमुकलीचि प्रतिक्रिया ऐकून मला अक्षरशः भरून आलं. “ती म्हणाली अरे दादा मलानं लवकर घरी जायला नको वाटतंय कारण हे रस्त्या वरचे दिवे बघायला फार आवडतं,  मला ते कधीच दिसत नाहीत. कारण आम्ही बाहेर फार जातच नाही. “ काय बोलणार त्या चिमुकलीला ? स्वतःमध्ये अखंड तेवणारा दिवा असणऱ्या तिला अशा कृत्रिम प्रकाशाची काय गरज होती. उलट मनाची दारं बंद करून आत प्रकाशाची अपेक्षा करणाऱ्या मुखवटे असणाऱ्या माणसांपेक्षा हि चिमुकली फार थोर होती.
गाणं लिहून देण्यासाठी दुसऱ्या एका चिमुकलीचि वही तिने दिली, आणि ती पाहून मी थक्क झालो. आज सकाळ पासून काय काय पाहिलं, घडलं केलं, यातले सारांश असलेले शब्दतिने लिहून ठेवले होते. त्याच वहीत गाणं लिहिलं आणि तिला दिलं.
साधारण दोन तासाने खेडशिवापूरला पोहोचलो. तिथे रात्रीचं जेवण केलं. जेवायला बसल्यावर मी त्यांच्या शेजारी बसाव म्हणून चिमुकल्या मागे लागल्या. शेवटी सगळ्यांना बसवून जेवण दिलं. तिथेच बाहेर एका झाडाला हिरव्या दिव्यांची लायटिंग केली होती. तोच एक चिमुकलीने मला विचारलं “ दादा झाडाला पण असे दिवे लावतात का रे ?” मी म्हटलं हो. त्यालाही सजवायला नको का. आणि चटकन मनात विचार आलं हिला कोण सजावत असेल असं ?  
थोड्याच वेळात गाडीतून पुण्याची वाट धरली. गाडी मध्ये बसल्यावर पुन्हा सगळ्यांनी गाणी म्हटली. खरं म्हणजे शेख सर आणि माझ्याकडून मुलींनी म्हणवून घेतली. J आता आपण परत जाणार हि जाणीव त्यांना होऊ लागली होती. “परत कधी येशील रे आनंददादा” ? , “ आमचा तो गुप् फोटो देशील का रे आणून आम्हाला “ ? असे प्रश्न सगळ्या मला विचारून लागल्या. मीही लवकरच परत येईन असं भरवसा त्यांना दिला.


आयुष्यातली किती वर्ष अजून बाकी आहेत हे माहित नसलेले ते निष्पाप जीव आणि त्यांची जगण्याची धडपड पाहून आपण किती सुखाने ओसंडून वाहत आहोत याची जाणीव होते. शुल्लक गोष्टीवरून बिनसणारी नाती, येणार फ्रश्त्रेशन, कोलमडनारी मने आजूबाजूला पहिली कि वाटतं किती पोकळ आहे हे सगळं. दिलेलं आयुष्य आहे तसा स्वीकारणारे किती असतात ? आणि किती मध्ये ती सामोरा जायची हिम्मत असते ?  
अर्धा तासात पुण्यात पोहोचलो. बस मधून उतरून संस्थेकडे जाताना आकाशात चांदणं पसरलं होतं. आकाशातलं टीकाटनं (३ चांदण्या एका रेषेत ) दिसत होतं. मागे चंद्र शुभ्र प्रकाश शिंपडत होता. आणि मुलं चालत असलेली वाट जणू काही तो प्रकाशित करत होता. 

“या मुलांच्या आयुष्यात प्रकाश असाच कायम ठेव आणि कधीही निराशेचा काळा ढग येऊ देऊ नकोस ही

एकच प्रार्थना मी केली. आणि निरोप घेऊन परतलो.

                                                                          .....आनंद




Thursday, January 6, 2011

राजगड - १ जानेवारी २०११


राजगड -  १ जानेवारी २०११


वर्षाचा पहिला दिवस. आणि खास सुद्धा १/१/११.
या वेळी तो मी साजरा करायचं ठरवला होता राजगड चा ट्रेक करून. भटकंती हा आवडता विषय तर आहेच पण या वेळी त्याही पेक्षा जास्त महत्वाचा होतं ते मला माझ्या साठी वेळ देणं. हाच विचार करून ठरवलं आणि गेलो. 
३१ डिसेंबर च्या नशील्या रात्रीतून जग अजून जागा व्ह्याच्या आधीच १ जानेवारीच्या पहाटे राजगड चा रस्ता धरला. नवीन वर्ष साजरा करायचं आणि ते हि नशा करून आणि त्यात नशे मध्ये नव्या वर्षाचे संकल्प करून हा विचारच माझ्या कल्पेनेच्या पलीकडचा आहे .याचा अर्थ असा नाही कि नशा करूच नये किंवा त्यात गैर आहे कारण तो पूर्ण पणे वेगळाच वादच मुद्दा होईल. असो.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी केलेला राजगड चा ट्रेक हा एक अविस्मरणीय असा अनुभव ठरला.आणि नवीन वर्षाची सुरुवात हि खूप दिवस स्मरणात राहिला अशा या ट्रेक ने झाली. राजगड हा मला आवडणारा गड , कितीही वेळा गेलं तरी नेहमीच वेगळा भासणारा आणि नवीन रूपे दाखवणारा गड.
भटकंती प्रिय असल्यामुळे मागच्याच आठवड्यात कोल्हापूर आणि पन्हाळा झाला तरी लगेच पुन्हा अजून एक गड सर् करण्याची इर्षा काही कमी झाली नव्हती त्यामुळे  नवीन वर्ष वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची माझी परंपरा या वेळीही मोडली नाही आणि भल्या पहाटे मी राजगड ची वाट धरली आणि मस्त गारवारा अंगावर झेलत कोवळ्या उन्हा मध्ये गड कधी सर् झाला कळलाच नाही. निसर्ग आपल्याला दोन्ही हाताने भरभरून देत असतो याची प्रचीती क्षणाक्षणाला आली.




७.३० – ८ वाजता राजगड च्या पायथ्याशी पोचलो . डोंगरामागून उगवणारा नव्या वर्षाचा पहिला सूर्य दिसत होता . कॅमेरा सरसावून त्याचा मस्त फोटो घेतला. तोच झाडावर एक खारुताई जणू काही फोटोसाठीच तयार होऊन बसलेली दिसली . चिंचेच्या झाडाच्या फांदी मधून कोवळी किरणे अशी काही तीरा सारखी पुढे सरसावली होती कि जणू काही नवीन वर्षाची ओढ त्यांनाही वेड लावत होती.
मस्त पैकी फक्कड चहा पिऊन राजगडाच्या दिशेची वाट धरली. तोच समोर गावातल्या घरासमोरची एक भली मोठी विहीर समोर आली. हल्ली विहीर या प्रकाराने मला वेड लावलेच आहे . पाणी काढण्य साठी मोट लावलेली ती विहीर पाहून आणि त्या वर पाणी भरणाऱ्या म्हाताऱ्या आज्जी पाहून स्वतःचं छोटे पण जाणवलं. आपण शहरातली मानसं किती शुल्लक गोष्टीवरून चिडतो, भांडतो, आणि निराश होतो. पण इथे तर प्रगतीचा स्वप्नाचा किती दूर आहे . पण तरीही माणूस म्हणून हि साधी मानसंचं  मला जास्त जवळची वाटतात. त्या विहिरीच्या कठड्यावर उभा राहुंन तिचे ४-५ फोटो घेतले. मला नेहमी एक गुढ असा भास विहीर देते . काहीतरी खूप दडलेला आहे तिच्या मध्ये असा वाटत राहता. पण तरीही ती मला हतबल वाटत नाही उलट नेहमीच स्वतःशी हसत आहे असा वाटत राहत. जणू काही स्वतःमधेच गुंग अशी एखाधी अबोल राजकन्या.
विहिरीला मागे टाकून पुढची वाट धरली. उन खुपच कोवळा होतं आणि हवेत मस्त गारवा होता. इथे मनात हाच विचार आला कि नक्की काय हवा असतं माणसाला ? माणसाचं माणूस पण जपण्यासाठी इतके का कष्ट पडावेत ?





हिवाळा असल्या मुळे बरीच झाडा आपली जुनी पाने सोडून नव्या पालवीला जागा करून देत होती. कोण सांगत असेल झाडांना असा करायला ? जुनी पानें गलाल्यानंतर नवीन पाली फुटेलच हा विश्वास कोण देत असेल त्यांना ? कि आपण माणसाच फक्त भित्री असतो ? झाडे मात्र डोळे झाकून जी गोष्ट करत राहतात तीच माणूस मात्र कधीच करू शकत नाही हा विचार मनात आला आणि झाडांचा हेवा वाटला आणि तितकीच ती मोठी वाटली .
लालमातीची वाट संपून आता खडकाळ पायवाट सुरु झाली, दोन्ही बाजूने दाट झाडी आणि मधून गेलेली पायवाट. गर्द झाडी मध्ये मधेच होणारा सळसळ असा आवाज. डोंगराच्या उतारावर आपसूक पणे आलेली एकाच जातीची छोटी झुडपे इतकी लयबद्ध पणे उगवली होती जणू काही कुणी तरी शेतीच लावली आहे अशी भासत होती.
जसजसे वर चढत होतो तसा वाऱ्याचा आवाज वाढत होता आणि गारवारा बोचत होता. भर उन्हात थंडी भरेल इतका गारवारा पाहून निसर्गाची गम्मत वाटली . भर उन्हात जराही घाम इत न्हवता तो यामुळेच.
साधारण १ तासाने चोर दरवाज्या पर्यंत पोहचलो. त्या आधीची रॉक ची चढण मस्तच आहे. घोंगावणारा वारा, मागे खोल दरी आणि वर खुणावणारा राजगड. तिथल्याच एक खडकावर बसलो. दूर पर्यंत जणूकाही कुणीच नाहीये अस भासत होतं. प्रत्येक ट्रेक मध्ये एक असा क्षण असतो त्या क्षणी तुम्हाला वाटता कि हाच तो क्षण ज्या साठी हि सगळी धडपड केली . आणि माझ्यासाठी तो पहिला क्षण असाच होता.
आणि माझ्या नशिबाने तो मी अजून गडावर प्रवेश करण्या पूर्वीच आला होता.
चोर दरवाज्यातून गडावर प्रवेश केला. ३१ डिसेंबर गडावर साजरा करणारी काही हौशी मंडळी तिथे बघून छान वाटला. पद्मावती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. आणि मग सुवेळा माची कडे प्रस्थान केला. जाताना वाटेत राजवाड्याचे अवशेष दिसतात. ते पाहून खरोखर भरून यायला झालं आणि तोच समोर भगवा झेंडा वाऱ्याबरोबर झुंज देत फडकत होता. तो पाहून उर अभिमाने भरून आला कारण मागे बालेकिल्ला खुणवत असतो.
सुवेळा माची कडे जाणाऱ्या वाटेवर खूप सारी फुलपाखरे असणार असा मनात वाटत होताच आणि ती शक्यता प्रत्यक्षात उतरल्यावर तर आनंदच झाला . फार फुलपाखराच्या जाती काळात नसल्या तरी त्यांना कॅमेरा मध्ये बंदिस्त मात्र केला.
सुवेळा माची कडे जाताना मध्ये बिग होल लागता. मोठ्या खडका मध्ये असलेला ते होल अगदी पायथ्याच्या गावातूनच बघताना खुणावत असतं. त्या मध्ये एक अर्धा तास बसलो. एका बाजूला खोल दरी आणि एका बाजूने येणारा गारवारा . ट्रेक साध्य झाल्याचा हा तो दुसरा क्षण . थोड्या वेळाने खाली उतरून .पुन्हा पद्मावती माची कडे निघालो.
पद्मावती माची वरच येऊन जेवण केलं. गडावरच्या विहिरीचा पाणी इतका थंड होतं कि हात जणू काही गोठले. ते थंड पाणी तोंडावर मारला आणि इतकं फ्रेश वाटला कि अजून काही मिळाला नाही तरी चालेल असा वाटून गेला.
थोडा वेळ पद्मावती माची वर बसलो , मागच्या बाजूला असलेला तोरणा सुद्धा ढगांच्या आड लपछापिचा खेळ खेळत होता. राजगडाच्या तटबंदीवरून पुन्हा चोरदरवाजाच्या दिशेने वाट धरली.
तोच माकडांचा कळप समोर मस्त पैकी उड्या मारत होता. जवळ जातात सगळे दूर पळाले. चोर दरवाज्यातून पुन्हा गड उतरायला सुरुवात केली.





येताना मन खूप मोकळ मोकळ झालं होतं. आत काहीतरी दबून राहिलेलं आपसूक पणे बाहेर यावं आणि ते येताना एक अनामिक आनंद देऊन जावं असा काहीसं झालं होतं. मागे वळून पाहताना गड अजूनही तसाच भासत होता. पण आता मी मात्र वेगळा होतो. काही गोष्टी खरच समजण्या पलीकडच्या असतात. आणि त्यांचा अर्थ न लावलेलाच बर असतं.
असा हा दिवस आयुष्यभर स्मरणात राहील यात कुठलीच शंका नाही. आणि त्या बरोबरच लक्षात राहतील ते अगणित क्षण जे विकत घेता येत नाहीत.
माणूस किती छोटा आहे आणि आपल्याला अजून किती आणि काय काय आहे करायला याचीही जाणीव झाली. सरळ रेशेतल्या आयुष्याला अचानक अनेक वाटा फुटतात ना अगदी तसा होता कधी कधी. अचानक एखादी पायवाट पुढे खुणावत येते आणि आपल्याला आपसूक पणे तिच्या बरोबर घेऊन जाते. वाट चुकण्यात सुद्धा कधी कधी मजा असते कारण त्यातूनच नवीन वाटा सापडत असतात आणि गवसत असतो आपल्यातला हरवलेला मी”.
या वेळीही तो मला गवसला ,कदाचित हेच हवा असता प्रत्येकाला पण त्याची योग्य वेळी जाणीव होणं महत्वाचं, नाहीतर हाती काही उरेल याची अपेक्षा करणंच चुकीचा.
नवीन वर्षासाठी नवीन उर्मी मनात घेऊन ट्रेक वरून परत आलो तेच मुळी मनात नवी अशा घेऊन आणि पुन्हा याच इर्षेन अजून एक नवा गड सर् करण्याचं ठरवूनच.
आनंद