Powered By Blogger

Sunday, June 17, 2018

ऋतू पावसाळी



धुंद पावसाळी हवा
रंग सृष्टीचा हा नवा..
नवा साज तो लेवूनि
येई वेडी सर ही माहेरा....

चिंब ओली होते माती
नवे कोंब ते रुजती...
सावळ्या ढगांच्या साथीने
मन हिरव्या रंगात भिजती...

आळसावुनिया सृष्टी,
कूस ही बदले...
पुन्हा नांदायला येति ,
वर्षा ऋतूंची पाखरे...

निळा लुप्त झाला तरी,
सावळ्याची लागे ओढ..
पहिल्या प्रेमाची अशी ही,
भेट अधुरी क्षणभर..

इंद्रधनू कधी सोबती,
कधी गडद अंधार..
आठवांच्या या मौसमी,
कुणी छेडे तो गांधार..

आनंद
17 जून 2018

Wednesday, March 7, 2018

उगाचंच सहजंचं :- प्राजक्त





कधी प्राजक्ताचं फुल व्हावं, गळून पडावं अलगद जमिनीवर , कुणालाच कळू नये आपलं ते तरंगत जन्म घेणं,   कुणी पहाटे फुलं वेचून जावं पण आपण मात्र दडून बसावं कुणालाच न दिसता.  जवळच्या समुद्राच्या लाटांचा आवाज यावा आणि येत राहावा. काही काळ अनुभवावी ती निश्चल आणि चिरकाल वाटावी अशी शांतता. डोळे भरून बघावं निळं आकाश आणि त्याला खुणावावं उगाचंच.
 मग अचानक वाऱ्याने उठवावं त्या स्वप्नातून आणि जाणीव करून द्यावी तोकड्या आयुष्याची. उचलून फेकावं त्याने पायवाटेवर. मनात उगाच दाटावी भीती कुणाच्या पावला खाली चिरडले जाण्याची , मग अखंड काळ तोच विचार करत असताना एक नाजूक चिमुरडी ओंजळ यावी आणि आपल्याला अलगद उचलून घ्यावं.
माडाच्या वनातून सफर घडावी त्याच ओंजळीतून, समुद्र दिसावा आणि तिथेच सूर्यास्त ही. अश्रूंची दोन टिपं अलगद पडावी पाकळ्यांवर. अश्रू कुठले कसले काहीच न कळावं पण उगाच भरून यावं आपलंही मन,
परतावं पुन्हा अंधारलेल्या वाटेवरून त्याच ओंजळीतून, आता मात्र पुन्हा कधीच न परतण्यासाठी.
आपलीही वेळ संपत आलेली , एक दिवसाचं आयुष्य आता समारोपाला आलेलं. अश्रू आपले की त्या ओंजळीचे हे समजेनासं झालेलं. ओंजळीने सोडून द्यावा आपल्याला तुळशी वृंदावनावर ,तिथेच तेवणाऱ्या दिव्याने दिलासा मिळावा आणि
तेवढ्यात दिसावं चांदण्यांनी भरलेलं आकाश आणि ओढ लागावी पुन्हा जन्म घायची तेवढ्याच आशेने आणि सहजतेने.....!


आनंद
8  मार्च 2018

Thursday, February 15, 2018

आसमान




आसमान कभी अकेला नही होता,
पर फिर भी बहुत बैचैन रहता है आजकल..!


कभी जब धरती उसके नजरो के सामने से छुप जाती है,
 तो पानी की बुंदे हवाओ के साथ मिलकर आ जाती है उसका साथ देने, 
 कुछ चंद घडी गुजारती है..!


कभी जब धरती बहुत पास आ जाती है ,
तो पहाडो पे उतरके आसमान गुफ्तगु कर लेता है...!


कभी अंधेरी रात मैं चांद उजाला हो जाता है,
 तो आसमान पढ लेता है वो नज्म जो कभी लिखी थी..!


कभी पंछी उड़ते हुये मुस्कुराते है,
और सिखा जाते है नया तराना जो फिर बन जाता है साथी...!


कभी शाम को सूरज पुकारता है,
 और फिर समुन्दर की लहरों मैं उतर जाता है आसमान बेफ़िक्र होके....!


इतना सब इल्म जो मिलता रहता है ,आसमान को तो,
 फिर कौन कहेगा कि बेचारा अकेला है..!
फिर भी परछाई ढूंढता रहता है अक्सर ,
 शायद उसको अपने होने का यकीन अब तक नही है .....!


                                                                                                                15 फेब्रुवारी 2018