Powered By Blogger

Thursday, February 15, 2018

आसमान




आसमान कभी अकेला नही होता,
पर फिर भी बहुत बैचैन रहता है आजकल..!


कभी जब धरती उसके नजरो के सामने से छुप जाती है,
 तो पानी की बुंदे हवाओ के साथ मिलकर आ जाती है उसका साथ देने, 
 कुछ चंद घडी गुजारती है..!


कभी जब धरती बहुत पास आ जाती है ,
तो पहाडो पे उतरके आसमान गुफ्तगु कर लेता है...!


कभी अंधेरी रात मैं चांद उजाला हो जाता है,
 तो आसमान पढ लेता है वो नज्म जो कभी लिखी थी..!


कभी पंछी उड़ते हुये मुस्कुराते है,
और सिखा जाते है नया तराना जो फिर बन जाता है साथी...!


कभी शाम को सूरज पुकारता है,
 और फिर समुन्दर की लहरों मैं उतर जाता है आसमान बेफ़िक्र होके....!


इतना सब इल्म जो मिलता रहता है ,आसमान को तो,
 फिर कौन कहेगा कि बेचारा अकेला है..!
फिर भी परछाई ढूंढता रहता है अक्सर ,
 शायद उसको अपने होने का यकीन अब तक नही है .....!


                                                                                                                15 फेब्रुवारी 2018

Sunday, December 17, 2017

जगणे म्हणजे



जगणे म्हणजे,
शिंपल्यातले मोती शोधत वाहणे,
कधी हर्ष तर कधी निराशा, हाती झेलत जाणे..!


जगणे म्हणजे,
शंखातुनी जन्म घेऊनि मुक्त आकाश पहावे,
तिमिर दूर कराया अपुलाच प्रकाश व्हावे..!


जगणे म्हणजे,
रेती वरती पाऊल रेखत जाणे,
पुसले जरी जुने ठसे तरी, लाटेला खुणवत हसणे...!


जगणे म्हणजे,
नव्या दिशेला प्रकाश शोधत जाणे,
कड्याकपारी ओलांडुनी पल्याड पाहत जावे...!


                                                                                आनंद
                                                                                          17 dec 2017

Monday, November 20, 2017

नशा




कुणी लुटावे शब्द बापुडे
कुणी उधळावे सूर,
कुणी विकावी रितीच ओंजळ
अन लागावी हुरहुर....


कुणी लुटावी निसर्गमाया
कुणी टिपावे शुभ्र चांदणे,
कुणी शोधाव्या अंधारछाया
व्हावे तेथेच नांदणे....


कुणी पळावे सुसाट आणि
कुणी अलगद तरंगावे,
कुणी डोकवे अंतरात
अन जगणे व्हावे गाणे....


कुणी जमवती सखे सोबती
कुणी खुशाल चेंडू,
कुणा खुणावते दिशा एकटी
चला तीच धुंडाळू....


कुणकुणाची कथा इथे अन
कुणकुणाची व्यथा
जगणे म्हणजे हेच असावे
तृप्तीची ही नशा...!




                                                                        आनंद
                                                                               Nov 2017

Monday, October 23, 2017

उगाचंच सहजंच - जुनं नवं



जुन्या नव्याचं नातं खरंच गमतीशीर, एकमेकांना न सोडता दूर जाणं आणि कधी कधी सोडूनही जवळ असणं.
कदाचित आपलाच अट्टाहास असतो सुखाची भोळी स्वप्न रंगावायचा , स्वप्नातले रंग भावले कि वर्तमानातली काळी पांढरी सोबत दिसेनाशी होते ती याच मुळे.


जे हातात आहे तेवढं सांभाळता यायला हवं बाकी सगळं खूप साधं सरळ होतं मग.
इतरांना समजेल किंवा उमजेल हा नंतर चा भाग झाला, पण अर्ध आयुष्य आपले विचार इतरांना पटवण्यात घालवण्यापेक्षा निश्चल पाण्याच्या डोहासारखं राहणं जास्त अर्थपूर्ण आणि तितकाच अवघड असतं. तरंग खुशाल उठू द्यावे पण नंतर पुन्हा शांत होता यायला पाहिजे.


गळून पडलेल्या पानाला जर हिरवळ भावली आणि त्याने तिथेच राहायचा अट्टाहास धरला तर ऋतूचक्र चालेल कसं, तिथे पानाने समर्पण करून मातीत मिळून जाणं जास्त महत्वाचं आहे म्हणजे झाडाला नवा हुरूप येईल आणि हिरवळीला पुढच्या पानगळीची ओढ लागेल .....!


आनंद
26 Oct 2017

Thursday, September 14, 2017

उगाचंच सहजंच - रंग




क्षितिजावर हलके हलके तरंगणारे रंग आणि त्यांच्या कडे बघून झुलणारं निळंशार पाणी जसा वेळ जाईल तसं ते नकळत त्याच्या रंगात मिसळून गेलं. जसा अंधार दाटू लागला तसा रेतीवर उमटलेल्या पावलांनी निरोप घेतला. फुटपाथ वरचे दिवे लागले आणि वाटा उजळून निघाल्या. आणि त्या पिवळ्या लालसर रंगात मागे असलेल्या हिरव्या झाडाची वाळलेली पाने दिसली. 

आयुष्याच्या संध्याकाळी विसावलेली जगाला फारसा उपयोग नसलेली त्यांचा फोटो काढतानाच एका वयस्कर आज्जीने आपुलकीने चौकशी केली आणि ते फोटोतले रंग बघून आश्चर्य व्यक्त केलं.
तिच्या आयुष्यातले रंगही असेच सुंदर असावेत असं उगाच वाटून गेलं....!
अंधारात नाहीशा होणाऱ्या वाटेवर ती निघूनही गेली...! 






Saturday, August 12, 2017

हसरते




हसरते आज कल खफा खफा सी रहती है
केहती है कि मै उनका खयाल नही रखता,
मैं सोचता हूं, अगर ऐसा होता तो फिर,
वो कौन है जिनसे मैं अक्सर गुफ़्तगू करता हू..!

फिर जब मैं उनसे ये पूछता हूं ,
तो केहती है ,कि वो सिने मैं बंदी पडी है कबसे,
उनको खुले आसमान कि आस है,
अब उनको ये कैसे समझावू के इसी हसरत से उन हसरतो को जिंदा रखा है......


आनंद
12 ऑगस्ट 2017

Monday, June 19, 2017

ठहराव



















चलो कुछ दो चार पल रुक जाते है इस भीड मैं, इसी जगह,
देखते है कि कोई रुक के पूछता है ,
या फिर चलती गाडी की खिडकी से सिर्फ झाकता है,
दौडके के कोई हात पकडता है ,
या फिर छोड देता है हमे उसी राह पर,


इस भाग दौड मैं शायद बिछड गया था जो मकाम,
क्या फिर वो पुकरता है उसी चाहत से,
या फिर सिर्फ एक सिसकी सी भर देता है
हमारे वापस न आनेसे ,


रिश्ते जो बंद दरवाजो कि तरह चूप है,
क्या वो जग जायेंगे मेरे थमने से,
या फिर बिना कुछ कहे सुने निकल जायेंगे 
पीछे के दरवाजे से,


सबका आसमान वही तो था,
फिर बारिश कि बुंदे अलग कैसे हो गई,
ये काम आती थी जब लब्ज सुखेे पड जातें थे,
और रिश्तो को गिला करना होता था.


शुक्र इस बात का है कि फूल अभी तक
किराया नाही मांगते खुशबू का
वरना जो फुल कभी अपने थे 
वो पास से गुजरने पर थमा देते कागज कि पर्ची .....


जाने अंजाने इतने पेड खडे है राह मैं
उनकी अनगिनत टेहनिया झुलती है हवा मैं,
उसमे से एक टेहनी को तो याद होगी ,मेरी हथेली से पि हुई दो बुंदे....


अब ना गिला है ठहरने का और ना अफसोस है गुजरे लम्हो का,
सिर्फ ये चाहत है कि कोई यादों मैं बसे हुये घर से निकल के जालों को हटाये,
और खिडकी कि एक टुटी कांच से सुबह कि एक किरण अंदर झाक कर देखे,
मन हि मन मुस्काये और फिर लौट जाये अपने घर सुरज के साथ फिर लोटने के लिये.....!


                                                                                                   आनंद
                                                                                                  19 जून 2017


Monday, May 29, 2017

उगाचंच सहजच 4 : धुकं

आयुष्यातले कुठल्या क्षणांसाठी माणसाने स्वतः ला विसरून जावं ? आणि मुळात हि सुखाची हि धडपड कशासाठी ? असे प्रश्न खरतर खूप साधे आणि अनेकांना पडणारे.
अशा वेळी मला आठवतं ते धुकं.

समोरचं किंवा आजूबाजूचं दिसत नसूनही मनाला त्या अनिश्चिततेमध्ये आनंद वाटत असतो. पायाखालची वाट सोडून आजूबाजूला काहीही दिसलं नाही तरी सगळ्या गोष्टी आहेत तिथेच असतात. फक्त आपल्याला त्या दिसेनाशा होतात.

कुणाच्या इच्छेने धुकं कधी दाटत नाही. अनुरूप परिस्थिती निर्माण झाली कि ते आपसूक येतं.
आयुष्यातल्या अशा धुक्याना सुद्धा सामोरं जाता येणं म्हणजे खरतर मजा आहे. त्याच्याशी दोन हात केले आणि आपल्यातला प्रकाशाची जाणीव समोरच्याला झाली कि ते आपोआप विरळ होतं आणि अचानक गायब सुद्धा होतं.

आपल्या आतला प्रकाशाची ज्योत महत्वाची, ती जपत रहायचं मग अंधार असो  वा धुके असो वाट नेहमी उजळत राहते.
आणि याच उजळलेल्या वाटांवर आपल्याला स्वतः ला विसरायला लावणारे क्षण  आणि त्या सोबत येणारं सुख दोन्हीही गवासतात.
                                                                                                                          आनंद
                                                                                                                          29 मे 2017

Wednesday, April 5, 2017

वास्तव आणि स्वप्न

वास्तव आणि स्वप्न यात खरंतर कितीसा फरक असतो ? एका क्षणात गोष्टी घडूही शकतात आणि विसरू हि शकतात. गरज असते ती आहे त्या गोष्टीला सामोरं जाण्याची.

माणसाची किंमत आणि हिम्मत ठरते ती त्यावरूनच कारण पठारावरून वरून दिसणारं वास्तव कितीही हवाहवासा असलं तरीही शिखराचं स्वप्न असेल तर जग ठेंगणंच वाटतं.
म्हणूनच गरज असते ती समतोल साधण्याची वास्तवाला सामोरं जाताना स्वप्न विरून जाऊ नये म्हणून डोंगर पार करत राहायचं मग भलेही एखाद्या दरीत उतरून पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली तरीही शिखर मात्र स्वप्नात जपायचं.....
                                                                                                                                5 एप्रिल 2017

Wednesday, March 22, 2017

उगाचंच सहजंच 3 : उनाड


उगाचंच कधीतरी उनाड व्हावं, घराबाहेर बाहेर पडावं , पहावं मोकळं क्षिजित ,द्यावी एक साद त्या भटक्या आभाळाला.
त्यानेही वळून पहावं आणि हसावं गालातल्या गालात ,
हिणवावं खवळलेल्या समुद्राला , किनारा गाठू न शकणाऱ्या त्याच्या लाटेला राग यावा, वाऱ्याने पहावी तिची तगमग आणि लाटेला साथ देऊन आणून सोडावं किनाऱ्यावर, वाळूनं तृप्त व्हावं त्या चिंब स्पर्शानं आणि तोच क्षणात दूर व्हावी लाट, पुन्हा जन्म घ्यावा त्याच जुन्या जाणिवेनं.

दूर कड्यावरच्या एखाद्या वाळक्या झाडाने लक्ष वेधून घ्यावं, निष्पर्ण पण तरीही रेखीव, आकाशात ढगांची नांदी व्हावी आणि तोच एका चिंब सरीने मातीला गंध देऊन जावा, तृप्त होऊन त्या वाळक्या झाडाच्या शेवटच्या पानाने फांदीला निरोप द्यावा. पुन्हा उमटावी तीच जुनी निष्पर्णतेची जाणीव.

आपण हे सर्व पाहावं दुरून डोळ्यादेखत पण तरीही अंतर ठेवून अलिप्तपणे.
हीच अलिप्तता जपता यायला हवी , त्यातून कधी त्रयस्थपणे काही गोष्टी शिकता येतात पाहता येतात, एखाद्या प्रसंगात, अनुभवात स्वतः न गुंतता त्यातल्या बारकाव्याशी जोडून अर्थ लावता यायला हवा.

                                                                                                                                      आनंद