Powered By Blogger

Saturday, August 12, 2017

हसरते




हसरते आज कल खफा खफा सी रहती है
केहती है कि मै उनका खयाल नही रखता,
मैं सोचता हूं, अगर ऐसा होता तो फिर,
वो कौन है जिनसे मैं अक्सर गुफ़्तगू करता हू..!

फिर जब मैं उनसे ये पूछता हूं ,
तो केहती है ,कि वो सिने मैं बंदी पडी है कबसे,
उनको खुले आसमान कि आस है,
अब उनको ये कैसे समझावू के इसी हसरत से उन हसरतो को जिंदा रखा है......


आनंद
12 ऑगस्ट 2017

Monday, June 19, 2017

ठहराव



















चलो कुछ दो चार पल रुक जाते है इस भीड मैं, इसी जगह,
देखते है कि कोई रुक के पूछता है ,
या फिर चलती गाडी की खिडकी से सिर्फ झाकता है,
दौडके के कोई हात पकडता है ,
या फिर छोड देता है हमे उसी राह पर,


इस भाग दौड मैं शायद बिछड गया था जो मकाम,
क्या फिर वो पुकरता है उसी चाहत से,
या फिर सिर्फ एक सिसकी सी भर देता है
हमारे वापस न आनेसे ,


रिश्ते जो बंद दरवाजो कि तरह चूप है,
क्या वो जग जायेंगे मेरे थमने से,
या फिर बिना कुछ कहे सुने निकल जायेंगे 
पीछे के दरवाजे से,


सबका आसमान वही तो था,
फिर बारिश कि बुंदे अलग कैसे हो गई,
ये काम आती थी जब लब्ज सुखेे पड जातें थे,
और रिश्तो को गिला करना होता था.


शुक्र इस बात का है कि फूल अभी तक
किराया नाही मांगते खुशबू का
वरना जो फुल कभी अपने थे 
वो पास से गुजरने पर थमा देते कागज कि पर्ची .....


जाने अंजाने इतने पेड खडे है राह मैं
उनकी अनगिनत टेहनिया झुलती है हवा मैं,
उसमे से एक टेहनी को तो याद होगी ,मेरी हथेली से पि हुई दो बुंदे....


अब ना गिला है ठहरने का और ना अफसोस है गुजरे लम्हो का,
सिर्फ ये चाहत है कि कोई यादों मैं बसे हुये घर से निकल के जालों को हटाये,
और खिडकी कि एक टुटी कांच से सुबह कि एक किरण अंदर झाक कर देखे,
मन हि मन मुस्काये और फिर लौट जाये अपने घर सुरज के साथ फिर लोटने के लिये.....!


                                                                                                   आनंद
                                                                                                  19 जून 2017


Monday, May 29, 2017

उगाचंच सहजच 4 : धुकं

आयुष्यातले कुठल्या क्षणांसाठी माणसाने स्वतः ला विसरून जावं ? आणि मुळात हि सुखाची हि धडपड कशासाठी ? असे प्रश्न खरतर खूप साधे आणि अनेकांना पडणारे.
अशा वेळी मला आठवतं ते धुकं.

समोरचं किंवा आजूबाजूचं दिसत नसूनही मनाला त्या अनिश्चिततेमध्ये आनंद वाटत असतो. पायाखालची वाट सोडून आजूबाजूला काहीही दिसलं नाही तरी सगळ्या गोष्टी आहेत तिथेच असतात. फक्त आपल्याला त्या दिसेनाशा होतात.

कुणाच्या इच्छेने धुकं कधी दाटत नाही. अनुरूप परिस्थिती निर्माण झाली कि ते आपसूक येतं.
आयुष्यातल्या अशा धुक्याना सुद्धा सामोरं जाता येणं म्हणजे खरतर मजा आहे. त्याच्याशी दोन हात केले आणि आपल्यातला प्रकाशाची जाणीव समोरच्याला झाली कि ते आपोआप विरळ होतं आणि अचानक गायब सुद्धा होतं.

आपल्या आतला प्रकाशाची ज्योत महत्वाची, ती जपत रहायचं मग अंधार असो  वा धुके असो वाट नेहमी उजळत राहते.
आणि याच उजळलेल्या वाटांवर आपल्याला स्वतः ला विसरायला लावणारे क्षण  आणि त्या सोबत येणारं सुख दोन्हीही गवासतात.
                                                                                                                          आनंद
                                                                                                                          29 मे 2017

Wednesday, April 5, 2017

वास्तव आणि स्वप्न

वास्तव आणि स्वप्न यात खरंतर कितीसा फरक असतो ? एका क्षणात गोष्टी घडूही शकतात आणि विसरू हि शकतात. गरज असते ती आहे त्या गोष्टीला सामोरं जाण्याची.

माणसाची किंमत आणि हिम्मत ठरते ती त्यावरूनच कारण पठारावरून वरून दिसणारं वास्तव कितीही हवाहवासा असलं तरीही शिखराचं स्वप्न असेल तर जग ठेंगणंच वाटतं.
म्हणूनच गरज असते ती समतोल साधण्याची वास्तवाला सामोरं जाताना स्वप्न विरून जाऊ नये म्हणून डोंगर पार करत राहायचं मग भलेही एखाद्या दरीत उतरून पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली तरीही शिखर मात्र स्वप्नात जपायचं.....
                                                                                                                                5 एप्रिल 2017

Wednesday, March 22, 2017

उगाचंच सहजंच 3 : उनाड


उगाचंच कधीतरी उनाड व्हावं, घराबाहेर बाहेर पडावं , पहावं मोकळं क्षिजित ,द्यावी एक साद त्या भटक्या आभाळाला.
त्यानेही वळून पहावं आणि हसावं गालातल्या गालात ,
हिणवावं खवळलेल्या समुद्राला , किनारा गाठू न शकणाऱ्या त्याच्या लाटेला राग यावा, वाऱ्याने पहावी तिची तगमग आणि लाटेला साथ देऊन आणून सोडावं किनाऱ्यावर, वाळूनं तृप्त व्हावं त्या चिंब स्पर्शानं आणि तोच क्षणात दूर व्हावी लाट, पुन्हा जन्म घ्यावा त्याच जुन्या जाणिवेनं.

दूर कड्यावरच्या एखाद्या वाळक्या झाडाने लक्ष वेधून घ्यावं, निष्पर्ण पण तरीही रेखीव, आकाशात ढगांची नांदी व्हावी आणि तोच एका चिंब सरीने मातीला गंध देऊन जावा, तृप्त होऊन त्या वाळक्या झाडाच्या शेवटच्या पानाने फांदीला निरोप द्यावा. पुन्हा उमटावी तीच जुनी निष्पर्णतेची जाणीव.

आपण हे सर्व पाहावं दुरून डोळ्यादेखत पण तरीही अंतर ठेवून अलिप्तपणे.
हीच अलिप्तता जपता यायला हवी , त्यातून कधी त्रयस्थपणे काही गोष्टी शिकता येतात पाहता येतात, एखाद्या प्रसंगात, अनुभवात स्वतः न गुंतता त्यातल्या बारकाव्याशी जोडून अर्थ लावता यायला हवा.

                                                                                                                                      आनंद

Tuesday, February 28, 2017

Wanderlust Diaries : Girnar Hiking


"Somewhere between the bottom of the climb and the summit is the answer to the mystery why we climb.”

Our journey of Hiking the Girnar hill  35000 footsteps which includes more than 20000 rock steps (ascend + Descend) and elevation of 3666 ft height was an breathtaking experience and great endurance test as well.  It took 5.5 hours to climb and 4.5 hours to descend.

It was combination of steep climbs, forest ,cold breeze , star gazing in dark night,  mesmerising sunrise from Lord Dattatreya temple, splendid views of valley's from top and strong sunlight while descending.

In the end it has become lifetime memory which is all about will power, faith and belief that made this possible.

                                                                                   Anand
                                                                                   26 feb 2017

Monday, January 9, 2017

वेल


सहज सुंदर नाती कुठेही जुळतात, त्याला वेळेचं काळाचं बंधन नसतं.
झाड वाढतं तसं खरंतर ते एकटं होऊ लागतं फांद्या वर जातात जमीन दूर होऊ लागते.
फांद्यांना आकाश हवं असतं अन खोडाला जमीन. 
अशा वेळी एखादी वेल कुठूनशी येते आणि दोघांची गाठ बांधून ठेवते.

सगळ्याच झाडांना अशा वेली मिळत नाहीत. त्याला नशीब लागतं. 
जग मात्र त्या वेलीला परावलंबी म्हणून हिणवत राहतं. 
ज्याला जे हवं ते मिळवून देऊन वेल मात्र झुरत राहते. धागा जोडणाऱ्या या वेली मला जास्त भावतात ते त्याच मुळे. 
माणसांना जोडायला अशाच वेलींची गरज असते अवती भवतीच्याच जगात त्या असतातही फक्त त्या साठी झाडाच्या फांदी सारखं थोडं झुकावं लागतं 
आणि खोडा सारखं आधारवड व्हावं लागतं वेल आपोआप तुम्हाला बिलगते.



आनंद

Saturday, December 31, 2016

शब्द



शब्द नेहमी “गर्भार” असतात असं कुठेशी ऐकलेलं वाक्य .अचानक एकदम पुन्हा आठवलं आणि समोर आले ते तेच नेहमीचे ओळखीचे आणि तितकेच नवे शब्द ...! खरंच आहे पण शब्द इतक्या भावनांना जन्म देतात कधी व्यक्त तर कधी अव्यक्त..! जन्म दिलेल्या प्रत्येक वाक्याला अर्थ मिळतो आणि तिथे सुरु होतो चांगलं वाईट या रस्त्यावरचा प्रवास...!

काय गंमत असते नाही या शब्दांची , कधी एकांतात कुठेशी नजर लावून दूर पाहावं तर अचानक मनात दाटून येऊन गर्दी करतात. झरझर वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहा सारखे समोरून वाहतात. आठवणींशी असलेल्या घट्ट नात्याला निभावत कधी डोळ्याच्या कडा पाणावून टाकतात हे समजत सुद्धा नाही. एकांतातल्या अशा शब्दांना ओढ असते हातून सुटलेल्या क्षणांची .

कधी मात्र हेच शब्द खरोखर खळाळत्या पाण्यासारखे होतात. समोरचं माणूस कोण आहे कसं आहे याची फिकीर न बाळगता वाऱ्या सोबत मैत्री करून बेफाम होतात . त्यांच्या त्या कचाट्यात भलेभले अडकतात. असे हे शब्द जन्म देतात अनेक जिवंत क्षणांना आणि त्यात कधी रुजतात नवी नाती..!

कधी हेच शब्द जणू रुसल्या सारखे वागतात , मनात गर्दी करतात पण ओठातून जन्म घेत नाहीत , कधी वाट पाहत बसतात तर कधी कुणावर चिडून मुके होतात. समंजस नाती अशा न बोललेल्या शब्दांनी सुद्धा टिकून राहतात, नकळत केलेल्या मुक्या संवादाने जोडून राहतात. आपण उगाच अमुक अमुक माणसाला मनातल कळत असं म्हणत राहतो खरंतर शब्द तिथेही असतात फक्त त्यांचं अदृश्य रूप कुणालाच दिसत नाही. 

कधी शब्द बोचरे होतात , परिस्थितीला जुगारून वेगळे होतात , कधी समोरच्यावर तुटून पडतात तर कधी तीक्ष्ण बाणासारखे खुपतात. या शब्दांनी खोलवर झालेल्या जखमेला भरून यायला कधी आयुष्य पुरत नाही. नाती दुरावणारे हेच शब्द स्वतः किती एकटे असतील याची  मात्र कुणाला काळजी नसते.

रक्ताची नाती , मैत्रीची नाती , मानलेली नाती, जुळलेली नाती, बोजड नाती, हवीहवीशी नाती, ताणलेली नाती या सगळ्यात एक धागा समान असतो तो म्हणजे गर्भार शब्दांचा... कधी काय जन्मेल याचा काहीच पत्ता नसलेले सगळे जीव मात्र या शब्दांशी झुरत राहतात.  दूरचे कधी जवळ येतात तर कधी साद वेळेत न पोहोचल्याने कायमचा दुरावा निर्माण होतो.

आज वर्ष संपतंय , आणि अशाच सरत्या वर्षाचा मागोवा घेताना जाणवले ते फक्त असेच  गर्भार शब्दच ... त्यांचीच सोबत खूप महत्वाची ठरली आणि किनारा लवकर सापडला. पुढेही त्यांची सोबत अशीच राहणार असली तरी गेलेल्या शब्दांशी पुन्हा भेट नाहीच हे दुखः ही आहेच.  
आठवड्यापूर्वी पेरलेल्या बी मधून फुटलेला पहिला कोंब हा सुद्धा संवाद साधत असतोच, कोवळं असणं म्हणजे काय याची पुर्णतः प्रचिती देणारा आणि स्वतंत्रपणे मोकळ्या आकाशाकडे पाहणारा. निसर्ग आणि त्याचं हे मूक संवादाचं रुपडं म्हणजे शाश्वत गोष्टीं मधला अजून एक अनुभव...! 
शब्दवीण संवादु असं म्हटलं तरीही आत खोलवर काहूर असतच . नव्याने येणाऱ्या वळणाना आणि काही कोवळ्या लहानग्या शब्दांना पुन्हा घडवायला तयार होऊया कारण खरंतर “शब्द” फक्त संवाद साधतात आणि तेवढंच त्यांचं आयुष्य असतं..!


आनंद
३१ डिसेंबर २०१६   

Wednesday, October 12, 2016

उगाचंच सहजच 2 : हट्ट


कधीतरी उगाच हिरमुसून बसावं , रुसावं या आयुष्यावर , हट्ट करावा उगाच 
आणि दूर कुठे क्षितिजावर बुडून गेलेल्या सूर्याला म्हणावं नको येऊस पुन्हा
असं म्हणताच वाऱ्याने येऊन कानाशी कुजबूज करावी
त्या गार झुळुकेने छेडले जावे जुने ठेवणीतले सूर आणि 
अचानक डोळ्या समोर यावे धूसर पावसाळी दिवसाचे क्षण
त्यात दिसणाऱ्या समोर पडणाऱ्या थेंबानी हळूच कानोसा घेऊन 
आपल्या कडे बघावं आणि जमिनीत लुप्त होऊन जावं, 
मग दिसावी उबदार चूल आणि बाडगणाऱ्या ज्वाळा 
त्या मैफिलीत फडफडणाऱ्या पिवळ्या दिव्याने आपला जीव मुक्त करावा आणि
पसरावा काळामिट्ट अंधार आणि मग पुन्हां हिरमुसून बसावं,
हट्ट करावा ,रुसावं आणि कोसावं त्या दिव्याला परत उजळण्यासाठी, क्षणात डोळे उघडावे आणि 
बघावं समोर तांबड्या रंगाच्या क्षितिजावरून वर येणारं लाल सूर्य बिंब.....!


                                                             आनंद
                                                                                                                     
12 ऑक्टोबर 2016


Friday, September 30, 2016

जगण्यातला अर्थ





नको नभा तो तुझा पसारा
नको पर्वता तुझा नजारा
अफाट तुझिया दुनियेमध्ये,
एकही घरटे नसे पामरा....!

नको सागरा तुझा किनारा
नको दिशांचा तोच इशारा
धुंडाळूनी या जगास साऱ्या,
एकटाच तो फिरतो वारा....!

इथेच थांबून वळतो आता
इथेच थांबून जगतो आता
हरवून गेले तेच शोधतो
विसरून गेले ते आठवतो..!

हिशोब सारा इतका सोपा
अवघड उगाच करुनी बसलो,
उगा धावून काय मिळवले
चैन जीवाचा गमवुनी बसलो..!

सावलीत या सुखावतो अन,
ओंजळीत या घेतो माती...
विहीर अजून ती तशीच ओली,
कवेत घेतो काळे मोती...

कुठे झऱ्याची मंजुळ गाणी
कुठे वाहते नितळ  पाणी,
कुठे डोलते एकच पाते
जगास साऱ्या ते न्याहळते..!

प्रकाश खेळे लपंडाव अन
कधी सरी या डाव साधती,
ओथंबून हि पाने हिरवी
त्या तालावर स्वैर नाचती...

मुक्त पहाटे दिसे पाखरू,
बंधन त्याला नसे उडाया,
सांजवेळ हि येता दाटून,
घरट्यातच मग मिळते माया,

निसर्ग सांगे कसे वहावे
कसे लुटावे त्याचे देणे,
द्यावे घ्यावे आनंदाने,
अन नांदावे सोबतीने...!

साधे सोपे सरळ जगावे
नकोच खोटा तो देखावा,
श्वासाचे ते गणित नसावे,
जगण्याला या अर्थ द्यावा....!

                                                    आनंद
                                                                                                                         30 सप्टेंबर 2016